
जेव्हा एखाद्या बालकाचा जन्म होतो, तेव्हा त्या जन्मदात्या मातेला काय आनंद होतो याचं वर्णन कोणीच करु शकत नाही. त्याचा अनुभव हा फक्त तिचाच असतो. असेच एक भविष्य.
एका कुटुंबातील प्रथम संतती कन्या आहे आणि मुलाची अभिलाषा आहे. ती माता गरोदर असते. दिवस पूर्ण होतात. एके क्षणी बाळ जन्माला येते. तो मुलगाच असतो. त्या वेळेचा आनंद हा ज्याला त्यालाच ठाऊक. पण हा आनंद फार वेळ टिकला नाही. कारण जन्मलेलं बाळ फारच अशक्त होतं. त्यामुळे काचेच्या पेटीत त्याला श्वास घ्यावे लागत होते.
मला बातमी कळाली ती प्रथम आनंद व्यक्त करणाच्या दृष्कोनातून आणि दुस-यांदा फोन आला ते त्याची पत्रिका , ग्रहमान कसे आहेत हे जाणून घेण्यासाठी.
माझ्या सवयीप्रमाणे मी ते केले. त्याचं उत्तर मात्र निराशाजनक येत होतं. मी ते त्यांना लगेचच सांगितले नाही. कारण ते बालक जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याचा हा संघर्ष चालूच रहाणार होता आणि त्याचा काही उपयोगही होणार नव्हता. हे ही उघड दिसत होत.
मी काही गोष्टींबाबात थोडेफार मौनच पाळणं योग्य समजतो. कुणाचा अगदी तंतोतंत मृत्यू सांगणे हे जरी अभिमानाची बाब होत असली तरी ते अगोदरच सांगून प्रयत्न करणा-यांना नाऊमेद करणे मला आवडत नाही.
त्या बाळाचे आयुष्य फक्त पाच-सहा दवसांचे होते. तेवढीच त्याच्या आयुष्याची कमाल मर्यादा होती. जो पर्यंत ते जिवंत होते तोपर्यंत त्याचा जगण्याचा संघर्ष चालू होता.... आणि एके क्षणी त्यानी आपले जीवन संपवलं.
कधी कधी दुःख, भोग भोगण्यासाठीच एखादा जीव जन्माला येतो. तो ते भोगतो आणि आपले जीवन संपवितो. मृत्यूचे असे हे भाकित अगदी लहानपणीसुध्दा करावं लागतं. नाईलाजास्तव.
म्हतारपणी-वृध्दावस्थेत हे जरी करायचे म्हटले तरी थोडं फार वाईट वाटते..
पण मृत्यू हाच सुटकेचा मार्ग असतो हे मात्र सत्य आहे.
श्रीकांत आफळे,
सी ३-९, गुरुराज हौसिंग सोसायटी,
पद्मावती, पुणे ४११०३७
फोन- ०२०-२४३६७५३२
मो. ९८९०३४८८७७
Email- shrikantmaitreya@gmail.com