
माझ्या बाबतीत एक लहानपणीची गोष्ट सांगाविशी वाटते. माझे वय साधारण दहाच्या आतल्या घरात असेल. काही समस्या घेऊन माझे वडिल एका परधर्मिय व्यक्तिकडे गेले होते. त्याला त्यांनी तीन समस्या सांगितल्या. एक त्यांना असलेली संतती. जिला मेंदूचा विकार झालाय. वारंवार फिट य़ेतात. ही व्यक्ति बरी होईल का?
दुसरी समस्या. दुसरी संतती शिक्षणात सतत अपयशी होती आहे. ही शिकेल काय ?
आणि तिसरी समस्या नव्हती पण एक मार्गदर्शन हवे होते.
त्या व्यक्तिने जे भविष्य मला नव्हे तर वडीलांना सांगितले. ते मला आजही आठवते. त्यांचा शब्द न शब्द खरा झाल्याचे मला आजही स्मरते.
त्यांची जी एक संतती आजारी होती ती कधी बरी झालीच नाही. तर त्यांनी जी आयुष्याची कमाल मर्यादा सांगितली होती. बरोबर त्याच काळात त्या व्यक्तिने आपली जीवनयात्रा संपविली.
दुस-या संततीच्या बाबतीत एका वयाच्या विशिष्ठ काळानंतर तो खूप शिकेल. आत्ताचे जे अपयश आहे ते बदलणार नाही. आणि त्यांनी जे भविष्य़ सांगितले त्याप्रमाणे ते घडलही. अगदी तंतोतंत खरेही .
तिसरे मार्गदर्शन केले होते . ही संतती तांत्रिक शाखेकडील शिक्षण घेईल आणि घडले त्याप्रमाणेच.
ही तीनही भाकिते माझ्या लहानपणी कुणीतरी सांगितलेली. पण त्याचा परिणाम माझ्यावर खोलवर झाला. माझ्यातील आज कांही ज्योतिषी आहे. त्याची पाळंमुळे कुठेतरी या गोष्टीत आहेत असं मला वाटतं.
भविष्य हे शास्त्र आहे. भविष्य हे खरं शास्त्र आहे आणि ते बदलता येत नाही. तिन्ही गोष्टी आजही माझ्या मनात जशाच्या तशा अढळ आहेत, हे मात्र नक्की.
-श्रीकांत आफळे,
सी ३-९, गुरुराज हौसिंग सोसायटी,
पद्मावती, पुणे ४११०३७
फोन- ०२०-२४३६७५३२
मो. ९८९०३४८८७७
shrikant maitreya shrikantmaitreya@gmail.com
No comments:
Post a Comment